Just another WordPress site

डांभुर्णी येथे मेंढपाळ कडपातून बिबट्याने केली लहान मुलीची शिकार !! दुसऱ्यांदा घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी भयभीत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ एप्रिल २५ गुरुवार

तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र.७४१ मध्ये मेंढपाळांचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून वास्तवाला आले असून काल दि.१६ एप्रिल बुधवार रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास आपल्या आईसोबत झोपलेली दिड दोन वर्षाची चिमुकली नामे रत्नाबाई सतीश रुपनर हिच्यावर बिबट्याने झडप घालून आई जिजाबाई रुपनर हिच्याजवळून उचलून केळीच्या बागेत पसार झाल्याची घटना रात्रच्या सुमारात घडली आहे.सदरील घटनेत लहानगी बालिका मरण पावली असून या बालिकेला वाचविण्यास तिचे पालक बिबट्यापुढे असार्थ ठरले आहे.दरम्यान सदरील घटनेमुळे परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावले असून वन विभागाच्या कार्यपणाली बाबत शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील डांभुर्णी शेत शिवार काइभुईच्या जंगलात मेंढपाळांचे तीन कुटुंब शेतात वास्तव्याला आले असून दिवसभर आपल्या मेंढ्यांना जंगलात चारून रात्री झोपी गेल्याने दोन वर्षाच्या रत्नाबाईला आपल्या कुशीतून बिबट्याने उचलून नेल्याचे जिजाबाई रुपनर ह्या सांगत होत्या तसेच रात्रीची वेळ असल्याने व शेताच्या दोन्ही बाजूंनी केळीची बाग असल्याने लहान मुलीला मात्र आपला जिव गमवावा लागल्याची हि यावल तालुक्यात दुसरी घटना घडल्याने परिसरातील शेतकरी व मजूर धस्तावले असून सदर बालिकेच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी सदर घटनेबाबतची माहिती रात्री एक वाजेच्या सुमारास वन अधिकारी विपुल पाटील,पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे व अन्य सहकार्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शन खाली विपुल पाटील सह संपूर्ण सहकारी पथक घटनास्थळी रवाना झाले.सदरहू घटनेची माहिती घेत रात्री गस्तीलाही हे पथक थांबहुन होते तसेच डांभुर्णी पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहिती वरून यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली त्यांच्यासह पोलीस सहकाऱ्यांनाही रात्री घटनास्थळी भेट दिली.

शासनाच्या चुकीच्या धोरणाबाबत शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप !!

शासनाच्या चुकीच्या धोरणमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून रात्री अकरा वाजेला जंगलात विजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे शेतकरी वर्गातून बोलत आहेत.एकीकडे रात्री विद्युत पुरवठा तर दुसरीकडे हिंस्र प्राण्याची भीती त्यामुळे शेतकऱ्यांना पीक राखणे असह्य झाले असून त्यात मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांनी वनविभागा सह प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान किनगाव परिसरातील बिबटयाच्या हल्ल्यात मुलगा मयत झाल्याची घटना ताजी असतांना काल रात्री दोन वर्षाच्या रत्नाबाईला बिबट्या प्राण्याने उचलून नेल्यामुळे मेंढपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळून पडला आहे.या दरम्यान वन विभागाच्या पथकने रात्रीची गस्त घालून सकाळी सात वाजेपर्यंत मुलीचे अवशेष ( ४०० मीटर अंतरावर) तीन शेत ओलांडून केळीच्या बागेत आढळून आल्याने सर्वांचे अश्रू अनावर झाले.यावेळी वनक्षेत्रपाल विपुल पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच सुनील भिलावे हे घटनास्थळी दाखल झाले तसेच प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीमला प्रचारण करण्यात आले आहे.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पो.पाटील यांचेकडून सांगण्यात आले आहे.

तातडीने मागविले पिंजरे !!

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व तालुक्यात दुसरी घटना घडल्याने वनपाल विपुल पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पुरवली असता वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शना खाली तातडीने पिंजरे मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच सदर बिबट्याला वन विभागाला यश येईल असे पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलतांना म्हटले आहे.दरम्यान सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरील मेंढपाळ कुटुंबाचे सांत्वन केले.तर शासन स्तरावरून योग्य ती मदत मिळवून देण्यास मी कटिबद्ध असल्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी म्हटले आहे.यात रत्नाबाई रुपनर या लहानग्या बालिकेच्या पश्चात आई,वडील,एक मोठा भाऊ,एक मोठी बहीण असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.