यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ एप्रिल २५ गुरुवार
भविष्यात भेडसावणाऱ्या पेयजल संकटावर मात करण्यासाठी तालुक्यातील चितोडा गावाकरीता शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतुन बांधले जात असलेल्या जलकुंभाचे काम कधी पुर्ण होणार? या प्रतिक्षेत ग्रामस्थ मागील दोन वर्षापासुन वाट बघुन त्रस्त झाले आहे.
राज्य शासनाच्या जिल्हा परिषद विभागाच्या माध्यमातुन यावल तालुक्यातील चितोडा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमचा मार्गी लागावा यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जलजिवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे ७६ लाख रुपये खर्चाने जलकुंभाची उभारणी आणी गावापासुन सुमारे ७ किलोमिटर लांब असलेल्या वड्री धरणातुन जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याचे काम कासव गतीने सुरू असल्याचे ग्रामस्थांकड्डन बोलले जात आहे.सदरहू सदरील काम हे कासवगतीने होत असल्यामुळे किमान काही वर्ष अजुन तरी हे काम पुर्णत्वास जाणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान संबधीत विभागाचे अधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे व ठेकेदाराच्या निष्काळजी पणाची कार्यपध्दतीला घेवुन ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.गावातील पाण्याची टाकी जलकुंभ अपुर्ण असुन सदरचे काम हे जलदगतीने पुर्ण व्हावे या करीता ग्रामस्थ स्थानिक कार्यालयाच्या वारंवार चक्रा मारून त्रस्त झाले असुन अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून आम्ही करतो यु करू त्यु करू असे मोठ मोठे आश्वासन देवून लोकांची दिशाभुल करत असल्याची प्रतिक्रीया गावकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.