“वैदिक ब्राह्मण्यवादी वर्ग हा नेहमीच संत परंपरेचा दुश्मन !”-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सडकून टीका
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानवेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केल्याप्रकरणी राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी या प्रकरणावरून टीकास्त्र सोडले आहे.आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणी वैदिक ब्राह्मण्यवादी वर्गााचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे.पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचे देवस्थानने निर्णय घेतला आहे व तशी विनंती दिंडी मालकांना,फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे असे असतांना काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.लाठीमार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या बडतर्फीची मागणी करण्यात येत आहे तसेच याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली आहे.
इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची घटना घडली.शिस्तप्रिय आणि कोणाला त्रास न देता निघणाऱ्या वारीवर हल्ला करणे हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक आहे?वैदिक ब्राह्मण्यवादी वर्ग हा नेहमीच संत परंपरेचा दुश्मन राहिलेला आहे.संत परंपरेला नेहमीच संपवण्याचे काम वैदिकांनी केले आहे.वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा आम्ही पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करतो असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सदरील वारकऱ्यांवरील लाठीचार्ज बाबत बोलतांना संजय राऊत म्हणाले की,पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता.देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो की महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी काय निर्माण झाली ती काल आम्ही पाहिली तुमच्या राजवटीत.याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आहे.आळंदीच्या वारीचे नियोजन राजकीयदृष्ट्या आपल्या हातात असावे.देवळात कोणी जावे,किती लोकांनी जावे,कसे जावे याचे नियोजन भाजपाचे काही बोगस आचार्य,प्राचार्य,दृढाचार्य तिथे बसून करत होते यातून वारकरी आणि त्यांच्यात वाद झाला.शेवटी ती परंपरा संस्कृतीची वारकऱ्यांची आहे.राजकीय टग्यांची नाही त्यातून पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीमार करावा लागला.बेदमपणे वारकऱ्यांना मारताना चित्र दिसतेय त्यामुळे लाठीमार झाला हे कोणी नाकारुच शकत नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.