“एक माणूस राक्षसी महत्त्वकांक्षेने एका मोठ्या राजकीय पक्षाला संपवून टाकतो,हे मात्र मराठी म्हणून मला पटत नाही”
वर्तमान पत्रातील जाहिरातींवरून जितेंद्र आव्हाड यांची भूमिका
सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गेल्या महिन्यात जाहिर करण्यात आला.या निकालात सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचे सरकार पुनर्स्थापित करता येत नाही असे म्हटले तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आपल्या अखत्यारित येत नसून तो विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे.विधानसभेचे अध्यक्ष हे मुख्य प्रतोद आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील.दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या या निकालाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केले आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विधानसभेत व्हीप कोणाचा असेल,लीडर ऑफ हाऊस कोणाचा असेल याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेय हे जाणून घेतल्यापासून देवेंद्र फडणवीस या विषयावर एकही शब्द बोलत नाहीत.देवेंद्रजींचे एकच म्हणणे असते की,जितेंद्र ना… जितेंद्रला काही कळतच नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा त्या हुशार माणसाने व्यवस्थित समजून घेतला आहे त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसतोय.