“..मात्र आत्तापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणार नाही” !! लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ फेब्रुवारी २५ गुरुवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत राहिली असून महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी ही योजना आहे व ही योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल तसेच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर किती भार पडला आहे हे देखील स्पष्ट केले तसेच ज्या अपात्र महिलांनी निधी घेतला आहे त्याबाबतही महत्त्वाच विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आल्याने फिस्कल स्पेस कमी झाली आहे मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार,ही योजना बंद करणार,ती योजना बंद करणार आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही.ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत.मी हेदेखील अधिकाऱ्यांना सांगितले की रिव्हर्स गणित मांडा की आपली प्रगती करण्यासाठी किती गुंतवणूक करायची आहे ? किती करु शकतो ? २५ हजार कोटींचा फरक पडत असेल तर ते आपण केंद्राकडून विविध योजनांमधून आणता येईल का ? याचा विचार आम्ही करतो आहोत.इतर कुठल्या योजनांच्या माध्यमांतून निधी उभा राहिल हे आम्ही पाहतो आहोत.महसुली तूट वाढते आहे म्हणून भांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅपमध्ये आम्हाला जायचे नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.