Just another WordPress site

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे परिसरातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ मे २५ बुधवार

तालुक्यात काल ६ मे मंगळवार रोजी अचानक आलेल्या वादळीवारा आणी बेमोसमी अवकाळी पावसामुळे गेल्या तिन महीन्यांपासुन कडाक्याच्या तापमानामुळे होणाऱ्या उकाड्यापासुन असहाय्य झालेल्या नागरीकांना थोडा दिसाला मिळाला असला तरी या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या केळी पिकाचे आणी अनेक लोकांच्या घरांची पतझड व रस्त्यावरीत मोठ-मोठी झाडे कोसळुन मोठे नुकसान झाले आहे.

   

दरम्यान डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या छताचा सरकलेला पत्रा

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,काल दि.६ मे रोजी यावल शहरासह निमगाव,राजोरा,विरावली,दहिगाव,सावखेडा सिम,मोहराळा,हरीपुरा,परसाडे,सातोद,भालोद, बामणोद,पाडळसे,कोळवद,कोरपावली,चितोडा,डोंगर कठोरा,बोरखेडा,हिंगोणा,सांगवी,मारूळसह परिसरात अनेक ठिकाणी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे.दरम्यान दहिगाव येथील पत्रकार जिवन चौधरी यांच्या घरावरील टीन पत्रे या वादळी वाऱ्यात हवेत उडून गेल्याची माहीती मिळाली आहे.तसेच डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या छताचा पत्रा या अवकाळी वादळी वाऱ्यामध्ये सरकला मात्र यात कुठलेही नुकसान झाले नाही.काही शेतकऱ्यांच्या केली बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे.तर काही ठिकाणांवरील मार्गावर मोठमोठी झाडे कोसळली असल्याने काही मार्गांवरील एसटी बससेवा व मोठया वाहनांची वाहतुक थांबविण्यात आली आहे.परिणामी काही अंशी परिसरातील जीवनावर याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.