मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती परंतु अद्यापी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्यामुळे सरकारमधील आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा असल्याची स्पष्टोक्ती प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.‘टीव्ही ९ मराठी’या वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना बच्चू कडू म्हणाले की सदरील सरकारचा कार्यकाळ सात ते आठ महिने उरला आहे त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची दिसून येत नाहीय.त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा ‘जैसे थे’ स्थितीत सरकार चालवनेच योग्य ठरेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
सध्या सर्वात मोठी अडचण हि पालकमंत्र्यांची आहे कारण एका जिल्ह्याला एक पालकमंत्री असेल तर त्या जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावायला सोपे जाते परंतु एकाच व्यक्तीकडे ८-९ जिल्ह्यांची जबाबदारी असल्याने लोकांच्या अडचणी वाढत चालल्या असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.शिंदे गटातील अनेक आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत त्यामुळे सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते त्याबद्दल विचारले असता बच्चू कडूंनी म्हटले की प्रभू श्री रामचंद्राबद्दल आमच्या मनात प्रचंड आस्था आहे.मलाही अयोध्येला जाण्याची इच्छा होती परंतु बाजार समितीच्या निवडणुका असल्याने त्याची आखणी तसेच रोगनिदान शिबिरही होते त्यामुळे अयोध्येला जाता आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.