“बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची महाराष्ट्रात औकात काय होती?”संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर
जाहिरातबाजीमुळे भाजपा-शिंदे गटाचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर
एकनाथ शिंदे हे वाघ आहेत या ५० वाघांमुळेच भाजपाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची महाराष्ट्रात औकात काय होती? अशा शब्दांत संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
अनिल बोंडेंच्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले,शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे वाघ आहेत या ५० वाघांमुळेच भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.एखाद्या मुख्यमंत्र्यांचे काम जनतेला पटत असेल आणि जनता कौतुक करत असेल तर ते पचवायची ताकद राजकीय नेत्यांमध्ये असायला हवी.एकनाथ शिंदे राज्यात काम करत आहेत त्यांना बेडकाची उपमा देणे किंवा ते ठाण्यापुरते मर्यादित आहेत असे म्हणणे चुकीचे आहे.पूर्वी तुम्ही (भाजपा) किती मर्यादित होता कुणाच्या संगतीने तुम्ही महाराष्ट्रात मोठे झालात? याचा विचार केला पाहिजे.बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून तुम्ही महाराष्ट्रात मोठे झाला आहात.बाळासाहेब ठाकरे नसते तर महाराष्ट्रात तुमची काय औकात होती? हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल बोलताना अनिल बोंडे सारख्या खासदाराने आत्मचिंतन करून बोलायला हवे असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.