यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ मे २५ बुधवार
रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सुचनेची तात्काळ दखल घेत रावेर आणी यावल तालुक्यात शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नोंदणी करण्यासाठी गावपातळीवर शिबिर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात असून या निमित्ताने आज दि.०७ मे बुधवार रोजी सावखेडा सिम येथून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान यावल-रावेर तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना विविध दाखल्यांसाठी वारंवार यावल तहसीलच्या फेऱ्या माराव्या लागतात यातुन नागरीकांची मोठी गैरसोय आणी त्रास सोसावे लागतात या दृष्टीकोणातुन आमदार अमोल जावळे यांनी नागरीकांना गावपातळीवर दाखले उपलब्ध करून द्यावे अशा सुचना महसूल प्रशासनास दिल्याने परिणामी प्रशासनाने याची दखल घेत तहसीलच्या वतीने यावल तालुक्यात ७ ते २६ मे दरम्यान ९ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरात संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना आणि अन्य सामाजिक लाभाच्या योजनांअंतर्गत लाभार्थ्यांचे डिजीटल पोर्टलवर आधार रजिस्ट्रेशन व व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.सदरील मोहिम तालुका व मंडळ स्तरावर प्रभावीपणे राबवण्यात येत असून संबंधित लाभार्थ्यांना आधार पडताळणीसाठी यावल तहसील कार्यालय आणि विविध मंडळ कार्यालयांमध्ये आयोजीत शिबिरांमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे.यावल महसुल प्रशासनाच्या आयोजीत करण्यात येणारी शिबीर ही पुढील प्रमाणे राहणार आहेत.यात १) सावखेडासीम दि.७ बुधवार,२) भालोद दि.८ गुरुवार,३) साकळी दि.१३ मंगळवार,४) किनगाव दि.१५ गुरुवार,५) बामणोद दि.१९ सोमवार,६)अंजाळे दि.२१ बुधवार,७)फैजपुर दि.२२ गुरुवार,८)न्हावी प्र. यावल दि.२३ शुक्रवार,९)यावल दि.२६ सोमवार या दिवशी शिबीर आयोजीत करण्यात आलेली आहेत.सदरहू लाभार्थ्यांना आधार रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी आधारकार्ड, दोन छायाचित्रे,मोबाईल क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.लाभार्थ्यांना आपल्या गावाजवळील ठिकाणी उपस्थित राहता यावे यासाठी ९ ठिकाणी ७ मे २०२५ ते २६ मे २०२५ दरम्यान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.तरी गरजु नागरीकांनी या गाव पातळीवरील शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी केले आहे.तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यावल यांनी दिलेल्या माहितीनुसार,यावल शहर व परिसरातील लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या केंद्रातच उपस्थित राहावे.आधार रजिस्ट्रेशन न झाल्यास लाभ थांबण्याची शक्यता असल्याने प्रत्येक पात्र लाभार्थ्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार शिबिरात उपस्थित राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.