Just another WordPress site

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग दुरूस्ती मागणीसाठी किनगाव निवासी स्कूलचे विद्यार्थी रस्त्यावर

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-

दि.२७ ऑगस्ट २३ रविवार

राष्ट्रीय महामार्ग म्हणुन ओळख असलेला ब-हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ होत असून या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघातांची मालिका सातत्याने सुरु आहे मात्र या महामार्गाच्या दुरूस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.सदरील महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असुन या रस्त्यावर रोज अपघात होत असतात मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबधीत बांधकाम विभागाने आजवर काहीही कार्यवाही केलेली नसून दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.मध्यप्रदेश,महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांशी  जोडणाऱ्या या राज्य मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.तर ठीकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाळ्याचे पाणी साचल्याने वाहन धारकांना खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नसून खड्ड्यांमध्ये  वाहणे आदळतात व वाहन धारकांना नाहक वाहनाच्या दुरूस्ती साठी भार सोसावा लागतो.ब-याचदा वाहन चालक खड्डे चुकवण्याच्या नांदात अपघात होतात व दोन वाहनधारकांनमध्ये शाब्दिक चकमकही होते मात्र आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने काही ठिकाणी खड्यांची तात्पुरती थातूरमातूर स्वरूपात डागडुगी केली जाते व दोन-तीन दिवसात परत जैसे थे परिस्थिती या रस्त्याची होत आहे.नेहमीच रहदारीचा हा रस्ता असल्याने व शाळेच्या स्कूल बस देखील या रस्त्यावर नियमित प्रवास करीत असतात.या स्कूल बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना या दयनीय रस्त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव यांच्या वतीने दि.२६ ऑगस्ट शनिवार रोजी किनगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.या रास्तारोको दरम्यान शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी रस्त्यावर उतरून महामार्गवरील खड्ड्या बाबतीत “यावल चोपडा रस्त्यावरील खड्डे बनले हाँस्पीटलचे अड्डे”,”देखो यावल चोपडा रस्ता हालत हो गई खस्ता”,”देशाने केले चंन्द्रावर यशस्वी लँन्डींग यावल चोपडा रस्त्याचे काम आहे पेंन्डींग” यासारख्या विविध घोषणा देण्यात आल्या सदरहू अर्धा तास हा रस्तारोको करण्यात आला.यावेळी इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील व सर्व शिक्षक,शिक्षीका यांनी राष्ट्रीय महामार्गचे अभियंता चंदन गायकवाड यांना निवेदन दिले.दरम्यान चंदन गायकवाड यांनी रास्ता रोकोच्या ठीकाणी भेट देत विद्यार्थीच्या समस्या जाणून घेत पावसाळा संपल्यावर लगेचच या रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगीतले.यावेळी स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शांततेत निवेदन सादर केले.सदरील आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरिक्षक मुज्जफर खान,पोलीस नाईक नरेंद्र बागुले,सहाय्यक फौजदार असलम खान,जाकीर तडवी,उमेश महाजन,निलेश वाघ,योगेश खोंडे,गोपणीय विभाग प्रमुख सुशील घुगे,सीमा चिघळकर,पो.पा.संघटनेचे जिल्हा कार्येअध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील डोणगाव,किनगाव पो.पा.उमेश पाटील, किनगाव बुद्रूकचे पो.पा.सौ.रेखाताई सचिन नायदे,नायगावचे पो.पा.मनोज देशमुख,सचिन नायदे यांचे सहकार्य लाभले.सदरील रस्तारोको आंदोलन यशस्वीतेकरीता इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे शिक्षक हर्षल मोरे,योगीता बिहारी,देवयानी साळुंखे,मिलींद भालेराव, भावना चोपडे,प्रतिभा धनगर,गोपाल चित्ते,पवनकुमार महाजन,सुहास भालेराव,प्रतिक तायडे,पुजा तायडे,सोनाली कासार,प्रतिभा पाटील, बळीराम कोतवाय,शेखर पाटील,वैशाली चौधरी,योगीता सावडे,रोहित बावीस्कर,मयुरी बारी,तिलोत्तमा महाजन,सोनाली वाणी,रत्ना बाविस्कर, वैशाली बडगुजर,बाळासाहेब पाटील यांच्यासह स्कुलबस वाहनचालक यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.